नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏🏻
महाराष्ट्रातील बरेच भागात भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. मागील 10-15 वर्षापासून भुईमूग लागवडीसाठी शेतकरी फारसा उत्सुक नाही कारण सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल आदी पर्याय उपलब्ध झाल्याने, तसेच मिळणारा बाजारभाव व मजुरांची कमतरता असल्याने या पिकाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले असले. तरी भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
भुईमूग पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उन्हाळी हंगामात सुद्धा चांगले उत्पादन शेतकरी बांधवांना मिळू शकते.
https://www.amazon.in/gp/product/B07F697QL8?ie=UTF8&th=1&psc=1&linkCode=ll1&tag=krishiratna-21&linkId=d65cce6e358cb2d8e744453d065a916c&ref_=as_li_ss_tl
भुईमुग पिकाचे व्यवस्थापन :
भुईमुगाची खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे 10 क्विंटल तर उन्हाळी हंगामात 14 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले असल्यामुळे त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे.
उन्हाळी हंगामासाठी योग्य भुईमूग जातींची निवड करावी. वेळेवर पेरणी करावी तसेच तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे सहज शक्य होते.
👉🏻पेरणीची योग्य वेळ :- १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत.
👉🏻पेरणीचे आंतर - 30 cm x 10 cm (दोन ओळीतील अंतर 30 सेमी. व दोन झाडा मधिल अंतर 10 सेमी.)
👉🏻हवामान : पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
फुलोरा अवस्थेच्या वेळी या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस लागते, नाहीतर फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. जास्त उशिरा पेरणी केली तर फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते. हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील असते. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.
👉🏻
जमीन आणि मशागत :-
👉🏻मध्यम प्रकाराची, भुसभुशीत अशी , चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
👉🏻जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त १२-१५ सें.मी. एवढीच ठेवावी. जास्त खोल नांगरणी केली तर जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. बऱ्याच वेळा पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना किंवा वखराने काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहण्याची शक्यता असते; परिणामी उत्पादनात घट येते.
👉🏻जमीन भुसभुशीत करण्यासाठी नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून घ्यावी. शेवटची वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे २ टन प्रतिएकर याप्रमाणे देण्यात यावे.
बियाणांचे प्रमाण :-
जाती प्रमाणे तसेच दाण्याच्या आकारमानाप्रमाणे बियाण्याचे प्रमाण ठरते.
👉🏻कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी ४० किलो,
👉🏻मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी ५० किलो
👉🏻टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी ६० किलो बियाणे वापरण्याची तजवीज आहे.
उन्हाळी भूईमुगाच्या जाती :-
एसबी – ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती), फुले धनी, फुले भारती, टीपिजी- 41 या जाती निवडाव्यात. उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच उत्पादनक्षमता, या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.
बीजप्रक्रिया:-
पेरणीपूर्वी 1 तास आधी
Carbendazim+ Mancozeb किवा Metalaxyl +Mancozeb 3 ते 5 gm प्रती किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेनंतर बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे.
**जिवाणुसंवर्धक बीजप्रक्रिया* *
👉🏻रायझोबियम कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि. किंवा
👉🏻स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (भुकटी) २५ ग्रॅम अधिक पोटॅश विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रव्य) ५ मि.लि.
👉🏻 बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया झाल्यानंतरच जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.
पानी व्यवस्थापन
तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
👉🏻पेरणीआधी ओलीत देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर किंवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी किंवा पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलीत करावे.
👉🏻 नंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाणी द्यावे. यावेळी जमिनीला भेगा पडलेल्या नाहीत, याची खात्री करून घ्यावी.
👉🏻फुलोरा येण्याच्या अवस्थेपासून (म्हणजेच पेरणीपासून २२ ते ३० दिवस) ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४० – ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५ – ७० दिवस) या वेळेस पाण्याची पाळी चुकवू नये.
👉🏻पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसारच ठरवावे.
👉🏻एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरून घेतल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
👉🏻ओलीत व्यवस्थापन करताना जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक असते.
खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन:-
👉🏻हेक्टरी 50 किलो युरिय व 300 किलो सिंगल सुपर फोस्पेट किवा 100 किलो डी ए पी याप्रमाणे खत लागवड करतांना व लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी दयावे.
👉🏻पेरणीवेळी ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रतिएकरी द्यावे. पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.
कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन
1) मावा, फूलकिडे, तुडतुडे :- प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी तसेच ( Profenophos किवा Chloropyriphos किवा Thaimethoxm) यापैकी एका कीटकनाशकाची फवारनी करावी..
👉🏻दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर-
Thaimethoxm + lambdacylothrine किंवा
Emamectine benzoate
सोबत
Propicanazol किंवा Hexacanazol किंवा
Tubecanzol + Sulphur
यापैकी एक बुरशिनाशक
याप्रमाणे करावी.
काढणी
भुईमुगाचा पाला पिवळा आणि शेंगाचे टरफल टणक झाल्यावर आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवून त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते ९ टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
उत्पादन
भुईमुगाची सुधारित पद्धतीने पेरणी, योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून ३० ते ३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा उत्पादन मिळते.
अशापद्धतीने आपण नियोजन केलयास उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
धन्यवाद 🌱🙏🏻🌱
डॉ. अनंत उत्तमराव इंगळे
संचालक ( VADF Gangai Agro Clinic Chikhali Dist Buldhana )
मो. 9689653854
Post a Comment